पर्यावरणपूरक विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले असून, त्याचाच एक भाग म्हणून राज्याच्या अखत्यारीतील टोल नाक्यांवर टोल माफी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेत इलेक्ट्रिक वाहन वापरकर्त्यांना सुखद धक्का देण्यात आला.
– या निर्णयानुसार मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतु, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (समृद्धी महामार्ग) या मार्गावर विद्युत वाहनांना टोलमाफी मिळणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
– यासंदर्भातील शासन निर्णय लवकरच जारी केला जाणार असून त्यानंतर ही टोलमाफी लागू होईल, असे त्यांनी सांगितले.- या धोरण अंतर्गत प्रत्येकी 25 किलोमीटर अंतरावर चार्जिंग करण्यासाठी ev चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे.
– व हा धोरण लागू झाल्यानंतर 2030 पर्यंत लागू राहणार असून या धोरणाचे अंमलबजावणीसाठी येत्या पाच वर्षासाठी 1993 कोटी रुपयांचा निधी तर तो दिला मंत्रिमंडळात बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.